परतीची वाट ... नात्यांच्या गुंत्यातून जाणारी!
परतीची वाट बाहेर पडणं किती अवघड हे गुंतल्याशिवाय समजत नाही, होणारी ही असीम तगमग अनुभवल्याशिवाय उमगत नाही.. नात्यांच्या मंद उजेडात आपण कोणाच्या सावलीत मिसळतो, तर कधी कोणाच्या शांततेत आपणच स्वतःला हरवून बसतो.. कधी ओढ इतकी हलकी, की स्पर्श होऊनही जाणवत नाही, कधी अंतर इतकं दाट, की जवळ असूनही भेटत नाही.. गुंतवताना काही गाठी प्रेमाच्या हे कळत नाही, आणि सुटताना त्याच गाठी वेदनेच्या होत्या हे जाणवत नाही.. कधी कधी नाती सुटण्याची इच्छा नसतानाही सुटतात, कारण ज्यांना धरून ठेवतो, तेच हातातून नकळत निसटतात.. आणि शेवटी जाणवतं, प्रेमाचा अर्थ जवळ ठेवण्यात नाही.. तर ज्यांच्या सोबत असताना आपण स्वतःपासून दूर जात नाही, असं नातं अनामिक असलं तरी खरं, टिकणारं आणि अत्यंत सुंदर असतं..! -तेजश्री शिंदे ✍️