माणूस ओळखून ठार मारले गेले.
माणूस ओळखून ठार मारले गेले. आता माणूस असणं धोकादायक झालंय... जिवंत असताना मृत्यूसाठी पात्र ठरवायचं काम एका नावाने, एका धर्माने, एका प्रश्नाने होतंय. "तुमचं नाव काय?" हा प्रश्न आता तुमचं आयुष्य ठरवतो. पण उत्तरात 'माणूस' म्हटलं, तर त्या उत्तरालाच गोळी घातली जाते. कधी वाटायचं की "माणूस" ही ओळख पुरेशी आहे... पण हल्ली तीच ओळख जीवघेणी ठरते आहे. डोळ्यांत आता ममत्व नाही, माणुसकीचा ओलावा नाही.. तिथं आहे फक्त एक थंड तपासणी. एखाद्या सीसीटीव्हीसारखी नजर — जी सतत विचारते, "तू कोण? कुठल्या बाजूचा?" आणि त्या प्रश्नाचं उत्तर मिळेपर्यंत प्रत्येक स्पंदनाला संशयाच्या नजरेनं पाहिलं जातं. ज्यांनी डोंगरात फुलं शोधायला पाय ठेवले, त्यांच्या हातात अखेर तिरडीचे हार आले. ज्यांनी थोडा निवांत श्वास घ्यावा म्हणून हिरव्याकंच हिरवळीत पाऊल ठेवलं, त्यांचं शेवटचं छायाचित्र गेल्या बातम्यांमध्ये "अपरिचित मृतदेह" म्हणून दाखवलं गेलं. त्या फोटोत दिसणाऱ्या पोरीच्या डोळ्यांत न शांतता आहे, न अश्रू — तिथं आहे एक भेसूर थांबलेली वेळ, जी किंकाळीत व्यक्त न होता...